काहीतरी लिहायचं म्हणून....
समतेच्या वाटेवरची. . .💖 तुझी- माझी कहाणी काहीतरी लिहायचं म्हणून सुरुवात केली. अनेक विषय डोक्यात आले. झोप काही येत नव्हती मग विचार केला, आपल्याबद्दल लिहावं आपल्या नात्याचं लिहावं. असं ही तू नेहमी म्हणत असते की ,बोलत नाही आपल्यावर लिहीत नाही तर आज लिहितो .आपल्या पहिल्या भेटीबद्दल हो हो दोन्ही भेटी काल्पनिक आणि वास्तविक! आपण भेटलो या आभासी जगात सहवासी, साथीदार म्हणून विचारांच्या बळावर !आपल्या मैत्रीचं प्रेम ही झालं आणि तेव्हाच रचले आपण सोबतीचा आयुष्याचे अनेक मनोरे! तू माझ्या घरी यायचं तेव्हा तुझं नाव बदलायचं .माझ्या असणार्या मैत्रिणींमधील स्पेस मध्ये तू येणार नाही वगैरे वगैरे ! खरंच छान होते ना ते दिवस! रोज सकाळी कॉल मेसेज सगळं कास छान आलबेल ! आपल्या भेटीही आपण स्वप्नेही पाहायला सुरवात केली आणि आणि काय काय ते नियोजन होते पहिल्या भेटीत आपण कुठे फिरायचं , काय करायचं, खूप गप्पा मारायच्या असं सगळं काही पाहायला ऐकायला आणि जगायला तेव्हा छान वाटायचं. आपण नेहमी म्हणायचो भेटूयात, बोलूय...